नमस्कार..!
`माझ्या आयुष्याचं ध्येय आहे जगातील जास्तीत जास्त लोकांचं आयुष्य बदलण्यात मदत करणे, माझी आवड लेखन आहे. निरनिराळ्या माध्यमातून सकारात्मक लेखन करून मी माझ्या आयुष्याचं ध्येय साध्य करू शकतो. या पद्धतीने मि माझ्या आवडीच्या व्यवसायाच्या साहाय्याने एक मोठं ध्येय निश्चित करून ते साध्य करतो. त्याचप्रमाणे `मला जगात माणुसकीचा प्रचार करायचाय आहे. अमर्याद संभावना यातून व्यक्त होऊ शकत नाही, तसच…………
? ‘तुमच्या आयुष्याचं ध्येय काय हो
या प्रश्नाचं उत्तर मला निश्चिती द्या. …………………………..
तर आजची परिस्थिती अशी आहे की लाखो उमेदवार एम.पी.एस.सी/ यु.पी.एस.सी.ची तयारी करतांना दिसतात. ते मोठ्या शहरापासून ते छोट्या मोठ्या खेड्यापर्यंत वसलेले असतात पण सर्वच मुलांना लायब्ररी, उत्तम पुस्तकांची दुकाने, चांगली वार्तापत्रे / मासिके उपलब्ध होतात का? तसेच जे उमेदवार नौकरी करतात किंवा कॉलेज त्यांना वेळ मिळत नाही हे सर्व शोधायला म्हणून मग मी विचार केला की का नाही अशी व्यवस्था करावी की सर्वांना एकाच ठिकाणी सर्व साहित्य उपलब्ध करून द्यावे. याच उद्देशाने मी औरंगाबाद अभ्यास केंद्र(Circle) तयार केले. ‘औरंगाबाद अभ्यास केंद्र‘ ही एक ओपन ग्रुप side असून तुम्हीही या वर तुमचे लेख पाठवू शकतात. अधिक माहितीसाठी भेट द्या,
औरंगाबाद अभ्यास केंद्र(ASC)
एक मोठं ध्येय साध्य करण्यासाठी त्याचं साधन किंवा मार्ग निश्चित करणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे त्या मार्गात आयुष्यातल्या काळाच्या हिशोबाने योग्य विभाजनसुद्धा व्हायला हवं. एक लांबचा प्रवास करताना अधुन मधुन येणारी गावं, आपल्या गावाजवळ पोहोचण्याची हुलकावणी देतात. त्याचप्रमाणे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्ग आणि रस्त्यात लागणारी गावं आपण निश्चित करू शकतो. याप्रकारे त्यासाठी त्याने व्यवस्थित योजना बनवणं आवश्यक आहे. तर ध्येयसिद्धी अधिक सुकर आणि लवकर होईल.
त्यासाठी ; ध्येय निश्चिती एकदा कागदावर उतरवल्यानंतर त्यावर आयुष्यभर अटळ राहणं तेवढंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपलं ध्येय फोकस करणे अनिवार्य आहे. फोकस जमवणे म्हणजे जी गोष्ट मनाशी ठरवली आहे, त्या गोष्टी व्यतिरिक्त किंवा त्याच्याशी संबंधित इतर गोष्टींव्यतिरिक्त आपल्याला काहीही दिसता कामा नये. सतत आपल्या ध्येया बाबतीतच विचार, कृती, बोलणं, ऐकणं, वाचणं, बघणं अशी मनस्थिती व्हायला हवी.
त्याचप्रमाणे, आपलं ध्येय किंवा स्वप्न जितकं कल्पना करता येईल तितकं मोठं आणि उंच ठेवायला हवं. त्याच्याशी आपल्या आजच्या वास्तविकतेचा किंवा कुवतीचा काहीही संबंध असू नये, कारण आपण नेहमी आपल्या क्षमताना कमी लेखत असतो. आपल्या स्वप्नांना ध्येयाला एका मर्यादेत बांधून ठेवतो, ज्यामुळे आपलंच नुकसान होतं. १00 पैकी १00 मार्क मिळवण्याची संधी असताना आपण `70-80′ मार्क मिळाले तरी खूप झाले असं म्हणतो आणि 70 मार्कच मिळतात. तसंच जर १00 पैकी १00 मिळवण्याची जिद्द बाळगली तर कमीत कमी 80 चा आकडा सहज पार करता येणं हेही तितकंच शक्य आहे. म्हणून खूप मोठं ध्येय ठेवून ते हुकण्यापेक्षा कधीही छोटं ध्येय ठेवून ते मिळवणं कधीही फायद्याचं ठरतं.
तसेच, ग्रामीण भागातील मुलांना योग्य मार्गदर्शना अभावी अडचण जाणवते व वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा च्या जाहिराती , ऑन लाईन फॉर्म भरने ,परीक्षेसाठी अभ्यास क्रम काय आहे ? चांगली संदर्भ पुस्तके कोणती ?, अभ्यासाचे नियोजन कसे करावे ?……असे एक न दोन अनेक प्रश्न विद्यार्थांना सतावत असतात. मी ह्या उपक्रमानुसार सर्व विद्यार्थ्यांच्या आग्रहावरून अभ्यास केंद्र(circle) व्हाट्सअप (WHAT’S APP) ग्रुप सुरू केला आहे,चालू घडामोडी ,स्पर्धा परीक्षा जाहिराती , यशस्वी उमेदवारांचे मार्गदर्शन असे विविध अपडेट्स व्हाट्सअप(WHAT’S APP) /Facebook ग्रुप उपक्रमानुसार चालू केला आहे. तरी ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी मैसेज करा,……………………..
महत्त्वाचे म्हणजे अनेक छोटे मोठे अपडेट्स या गृपवर उपलब्ध आहेतच तरीही काही मदत हवी असल्यास औरंगाबाद अभ्यास केंद्रला कळवू शकतात…!
स्वप्निल कनकुटे